म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महापालिकेने कांदिवली ते दहिसर विभागातील कचरा संकलनाचे काम नवीन कंत्राटदारांना दिल्याने हे कंत्राटदार जुन्या कंत्राटी सफाई कामगारांना काम न देण्याची भीती महापालिकेने दूर केली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईतील काही प्रभागात कचरा न उचलण्याचे सुरू झालेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परिणामी मुंबईकरांची कचराकोंडी तूर्त टाळली असून मंगळवारपर्यंत कामगारांच्या प्रश्नावर अहवाल तयार करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण ९ हजार मेट्रीक टनावरून ७ हजार २०० मेट्रीक टनापर्यंत म्हणजे सुमारे २० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे सर्व विभागातील कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या सेवा १५ टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील कचरा उचलून तो डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचवण्याचे कंत्राट नवीन कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कचरा उचलण्याची कामे करणाऱ्या कायमस्वरूपी व कंत्राटी सफाई कामगारांना रोजगार न मिळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे सफाई कामगारांनी शुक्रवारी मुंबईतील २४ विभागांत काम बंद आंदोलन केल्याने दिवसभरात रस्त्यांवर, चौकाचौकात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले होते. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पालिका अधिकारी व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यशस्वी मध्यस्थी केली. एकाही कामगाराचा रोजगार हिसकावला जाणार नसल्याचे प्रशासनातर्फे आश्वासन दिल्याने कर्मचारी संघटनांनी हे काम बंद आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. त्यामुळे मुंबईकरांसमोरील कचराकोंडी फुटली आहे. समन्वय समितीचे नेते महाबळ शेट्टी, बाबा कदम, के. पी. नाईक, सुखदेव काशीद, सुभाष पवार, सत्यवान जावकर, संजय वाघ यांच्या शिष्टमंडळाशी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी चर्चा करून येत्या मंगळवारपर्यंत माहिती घेऊन कामगाराच्या मागण्यांबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
येत्या मंगळवारपर्यंत पालिका प्रशासन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंत्राटाचे कामगारांवर नेमके काय व कसे परिणाम होतील, याचा अभ्यास अहवाल स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांना सादर करणार आहे. कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे नेते बाबा कदम यांनी सांगितले.
या भागात जमा झाले ढीग
घाटकोपर, बोरिवली, कांदिवली, दहिसर, भांडुप, मुलुंड, देवनार, कांजुर, पवई, कुर्ला, दादर, भायखळा, परळ, कुलाबा, चेंबूर, अँटॉप हिल, ग्रॅन्ट रोड, गिरगाव, अंधेरी
कामगार संघटनांचे म्हणणे काय?
- कचरा संकलनाचे कंत्राट फक्त कांदिवली, बोरिवली, दहिसर, मुलुंड या चार विभागांपुरते मर्यादित नसून ते टप्प्याटप्प्याने सर्व २४ विभागांत सुरू केले जाणार आहे. त्यामुळे सध्या काम करीत असलेल्या ५,५०० मोटर लोडर कामगारांचे काम कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे.
- कचरा संकलनाचे काम कंत्राटदाराला देण्याच्या निर्णयामुळे गेल्या १२ वर्षांपासून काम करीत असलेल्या ७,००० कंत्राटी कामगारांच्या नोकरीवर गदा य़ेणार आहे.
- मोटर लोडिंग कामगारांना दुसऱ्या विभागात बदली करण्यात येऊ नये, मार्च २०१८ पर्यंत काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना पूर्ववत करावे.
- कंत्राटी पद्धतीने कचरा उचलून भरणे व गाडीत भरलेला कचरा वाहून नेण्याचे काम कंत्राटदाराकडून करून न घेता ते काम पालिकेने करावे.
ज्या कंत्राटी कामगारांना न्यायालयाचे संरक्षण आहे त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये.
कर्मचारी संघटनांची मागणी पाहता एकाही कामगारावर अन्याय होऊ नये यासाठी प्रसंगी कचरा उचलण्याच्या कंत्राटाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याबाबत विचार करण्यात येईल.
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती
कांदिवली, बोरिवली, दहिसर या तिन्ही विभागांमध्ये कंत्राट दिल्यानंतर संबंधित सर्व कामगारांना ते सध्या कार्यरत असलेल्या विभागांमध्येच त्यांच्या आधीच्या कामाच्या स्वरुपाचेच काम देण्यात आले असून सर्वांच्या नोकऱ्या अबाधित आहेत. एकाही कामगारावर अन्याय होणार नाही.
- विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
महापालिकेने कांदिवली ते दहिसर विभागातील कचरा संकलनाचे काम नवीन कंत्राटदारांना दिल्याने हे कंत्राटदार जुन्या कंत्राटी सफाई कामगारांना काम न देण्याची भीती महापालिकेने दूर केली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईतील काही प्रभागात कचरा न उचलण्याचे सुरू झालेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परिणामी मुंबईकरांची कचराकोंडी तूर्त टाळली असून मंगळवारपर्यंत कामगारांच्या प्रश्नावर अहवाल तयार करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण ९ हजार मेट्रीक टनावरून ७ हजार २०० मेट्रीक टनापर्यंत म्हणजे सुमारे २० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे सर्व विभागातील कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या सेवा १५ टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील कचरा उचलून तो डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचवण्याचे कंत्राट नवीन कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कचरा उचलण्याची कामे करणाऱ्या कायमस्वरूपी व कंत्राटी सफाई कामगारांना रोजगार न मिळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे सफाई कामगारांनी शुक्रवारी मुंबईतील २४ विभागांत काम बंद आंदोलन केल्याने दिवसभरात रस्त्यांवर, चौकाचौकात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले होते. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पालिका अधिकारी व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यशस्वी मध्यस्थी केली. एकाही कामगाराचा रोजगार हिसकावला जाणार नसल्याचे प्रशासनातर्फे आश्वासन दिल्याने कर्मचारी संघटनांनी हे काम बंद आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. त्यामुळे मुंबईकरांसमोरील कचराकोंडी फुटली आहे. समन्वय समितीचे नेते महाबळ शेट्टी, बाबा कदम, के. पी. नाईक, सुखदेव काशीद, सुभाष पवार, सत्यवान जावकर, संजय वाघ यांच्या शिष्टमंडळाशी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी चर्चा करून येत्या मंगळवारपर्यंत माहिती घेऊन कामगाराच्या मागण्यांबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
येत्या मंगळवारपर्यंत पालिका प्रशासन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंत्राटाचे कामगारांवर नेमके काय व कसे परिणाम होतील, याचा अभ्यास अहवाल स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांना सादर करणार आहे. कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे नेते बाबा कदम यांनी सांगितले.
या भागात जमा झाले ढीग
घाटकोपर, बोरिवली, कांदिवली, दहिसर, भांडुप, मुलुंड, देवनार, कांजुर, पवई, कुर्ला, दादर, भायखळा, परळ, कुलाबा, चेंबूर, अँटॉप हिल, ग्रॅन्ट रोड, गिरगाव, अंधेरी
कामगार संघटनांचे म्हणणे काय?
- कचरा संकलनाचे कंत्राट फक्त कांदिवली, बोरिवली, दहिसर, मुलुंड या चार विभागांपुरते मर्यादित नसून ते टप्प्याटप्प्याने सर्व २४ विभागांत सुरू केले जाणार आहे. त्यामुळे सध्या काम करीत असलेल्या ५,५०० मोटर लोडर कामगारांचे काम कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे.
- कचरा संकलनाचे काम कंत्राटदाराला देण्याच्या निर्णयामुळे गेल्या १२ वर्षांपासून काम करीत असलेल्या ७,००० कंत्राटी कामगारांच्या नोकरीवर गदा य़ेणार आहे.
- मोटर लोडिंग कामगारांना दुसऱ्या विभागात बदली करण्यात येऊ नये, मार्च २०१८ पर्यंत काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना पूर्ववत करावे.
- कंत्राटी पद्धतीने कचरा उचलून भरणे व गाडीत भरलेला कचरा वाहून नेण्याचे काम कंत्राटदाराकडून करून न घेता ते काम पालिकेने करावे.
ज्या कंत्राटी कामगारांना न्यायालयाचे संरक्षण आहे त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये.
कर्मचारी संघटनांची मागणी पाहता एकाही कामगारावर अन्याय होऊ नये यासाठी प्रसंगी कचरा उचलण्याच्या कंत्राटाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याबाबत विचार करण्यात येईल.
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती
कांदिवली, बोरिवली, दहिसर या तिन्ही विभागांमध्ये कंत्राट दिल्यानंतर संबंधित सर्व कामगारांना ते सध्या कार्यरत असलेल्या विभागांमध्येच त्यांच्या आधीच्या कामाच्या स्वरुपाचेच काम देण्यात आले असून सर्वांच्या नोकऱ्या अबाधित आहेत. एकाही कामगारावर अन्याय होणार नाही.
- विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग